Friday 13 May 2011

छापखाना

उघडल्यावर एक तरूण आत आला. त्याला माझ्याशी काही महत्वाच बोलायच होत. मी त्याला पाणी हवय का? म्हणून विचारल. थोड पाणी पिऊन त्याने सांगायला सुरूवात केली.
माझ नाव सागर मराठे. मी डिप्लोमा केला आहे. माझ वाशीत प्रिंटींग मशीन विकण्याच आणि दुरुस्त करण्याच दुकान आहे. बर्याच मोठ्या कंपन्यांच्या printersची काम माझ्याकडे आहेत. हे थोड माझ्याबद्दल सांगून मुद्द्याच बोलायला सुरूवात करतो. परवा सकाळची गोष्ट. मी नुकतच दुकान उघडल होत आणि मागचे काही records तपासत होतो. त्याचवेळी एक माणूस दुकानात आला. साधारण ४५ ते ५० दरम्यानचा असावा. त्यान त्याच नाव हरिकुमार अस सांगितल सकाळची वेळ होती. घरात मी एकटाच होतो. पेपर वाचत होतो. त्याचवेळी दाराची बेल वाजली. दार. त्याचा वावडा या गावी छपायी कारखाना आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून त्याचे प्रींटर्स बंद आहेत. त्याची दुरूस्ती करायला त्याला माझी मदत हवी होती. बदल्यात तो तासाचे R,००,००० तसेच प्रवास भाडे देणार होता. एवढे पॆसे मिळणार म्हणून मी तयार झालो.
त्याच्या सांगण्यानुसार पनवेलहून रात्री वाजता वावड्याला जाणारी ट्रेन आहे. त्याचा छापखाना ६ किमी असल्याने स्टेशनवर तो स्वतः मला गाडीने घ्यायला येणार होता. त्यानुसार मी त्या ट्रेनने ९ वाजता वावड्याला पोहचलो. स्टेशनबाहेर तो गाडी घेवून तयारच होता. मला नंबर नक्की सांगता येणार नाही. गाडी अगदी ऎसपॆस होती. गाडी चांगालीच वेगाने चालली होती. रस्त्यावर गर्दी अजीबात नव्हती. माझ्या अंदाजानुसार आम्ही ५ मिनीटांत पोहचणार होतो. पण आम्हाला पोहचायला तब्बल अर्धा तास लागला.
शेवटी आम्ही पोहचलो एकदाचे. ज्या ठिकाणी आलो ती जागा खूप मोठी होती. तिथे घेवून येणारा हरिकुमारने मला आत नेले. मी त्याचा प्रिंटर बघितला. कागद भरायच्या जागी कचरा झाला होता. मी तो साफ केला. पण मला तो वेगळा वाटला. कारण कमी प्रकाशातसुद्धा तो चमकत होता. अगदी चांदीसारखा! माझ काम झाल्यावर हरिकुमार मला त्यांच्या केबिनमध्ये घेवून गेले. माझ दीड तासात झाल होत. त्यानुसार मला R१,५०,००० मिळाले. नंतर त्यानी मला एक सरबत प्यायला दिल. लिंबू-सरबत होत ते. पण ते प्यायल्यावर मला चक्क गाढ झोप लागली. मी उठलो तेव्हा १२.३० वाजले होते आणि मी वावडा स्टेशन्वर होतो. मला काहीच कळत नव्ह्त. शेवटी विचार केला आणि तुझ्याकडे आलो.”
त्याच बोलण ऎकून मी त्याला घ्यायला आलेल्या गाडीबद्दल विचारल. तो म्हणाला “गाडी अगदी नवी होती. पण तिचा काचा खूप गडद होत्या. त्यातून बोहेरच काहीच दिसत नव्हत.” मग मी त्याला काही संशयास्पद वाटल का? अस विचारल. त्यावर त्याने सांगितल की काम करताना त्याला दोनदा रेल्वेचा हॉर्न ऎकायला आला. त्याच्या उत्तरावरून माझा संशय खरा ठरला. मी त्याला खायला दिल आणि थोडा वेळ थांबायला सांगितल. मी लगेच तयार झालो आणि माझा पोलिसखात्यात मित्र असलेल्या इन्स्पेटर जाधवला फोन केला. तो म्हणाला, “आपण लगेच तिकडे निघुया. तुम्ही दोघ, मी आणि दोन कॉन्सेबल असे पाच जण लगेच निघूया. तासाभरात तुम्ही स्टेशनवर पोहचा.”
त्याच्या सांगण्यावरून आम्ही स्टेशनवर पोहचलो. ते तिघ तयारच होते. गाडीत बसलो आणि तासाभरात वावड्यला पोहचलो. स्टेशनवर पोलिसांची गाडी तयार होती. गाडीत बसल्यावर सगळ्यांची कुठल्या दिशेने जायचे यावर चर्चा सुरू झाली. चॊघांनी चार दिशा सांगितल्या. शेवटी जाधवने मला विचारल. मी म्हणल, “गाडीची काहीच गरज नाही. छापखाना स्टेशनच्या जवळच आहे. कारण सागरला दोनदा ट्रेनचा हॉर्न ऎकायला आला होता.” सगळ्यांना ते पटल. जवळपास चॊकशी केल्यावर जवळच एक बिल्डींग असल्याचे समजले.
पोलिस आल्याचे बहुदा हरिकुमारने पाहिले असावे. कारण बिल्डिंगजवळ पोहचल्यावर आमच्या दिशेने दोन गोळ्या झाडण्यात आल्या. उत्तरादाखल जाधवने खिडकीच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्या एखाद्या धातूवर आपटल्या असाव्यात. २ सेकंद शांततेत गेली. आणि…
आणि एक जोरदार स्फोट झाला. आम्ही त्यातून कसेबसे निसटलो. अग्निशनदलाला ती आग विझवायला ४ तास लागले. जानकारांनी सांगितल की ती आग जनरेटरच्या स्फोटाने झाली. बिल्डींगच्या ढिगार्यात एक बॉक्स सापडला. त्यात १०००च्या नोटा होत्या. RBI ने त्या नकली असल्याचे सांगितले. या घटनेचा पोलिसांनी खालीलप्रमाणे पंचनामा केला – “पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जनरेटरचा स्फोट होवून इमारतीला आग लागली. या इमारतीत नकली नोटा छापण्याचा छापखाना होता. इमारतीत कामाला असलेली तीन माणसे जळून ठार झाली.”

Friday 15 April 2011

प्रथम प्रकरण

स्पर्धा जिंकून फार-फार तर आठवडाच झाला होता. दुपारी संगणकावर F1चा खेळ खेळत असताना माझा मोबाईल वाजला. नवीन नंबर होता. मी फोन उचलला. फोन एन्स्पेटर जाधव यांचा होता. हे जाधव मुंबईत कामाला. त्यांना एक गुन्हा सोडवायला माझी मदत हवी होती. मी तात्काळ होकार दिला. त्यांनी प्रकरणाबद्दल सांगायला सुरुवात केली. वडाळा पश्चिमेला श्री. शिवराज पाटील म्हणून होते. त्यांच्या घरात R१५,००,०००ची चोरी झाली होती. हे पाटील दिसायला सभ्य असले तरी त्यांच्या वरपर्यंत ओळखी होत्या. त्यामूळेच २४ तासांच्या आतच पोलीसांवर दबाव यायला सुरुवात झाली होती. याला कंटाळून जाधव यांनी मला फोन केला. त्यांना माझा नंबर वरिष्ठांनी दिला. त्यांचे बोलणे ऎकल्यावर मी त्यांना मदत करायला होकार दिला व दुसर्या दिवशी येवून घराची तपासणी करू असे सांगीतले.
दुसर्या दिवशी दिवशी सांगितल्याप्रमाणे पाटील यांच्या घरी पोहचलो. त्यांचे घर दुसर्या मजल्यावर होते. घराला ८ फूट उंचीचे व ५ फूट रुंदीचे मजबूत लोखंडी दार होते. पण याच दाराचे लॊक उचकटले होते. हॊलमध्ये खूप पसारा होता. मी थोडे तपासल्यासरखे करून आतमध्ये गेलो. आतल्या एका खोलीत गोदरेजचा मोठा लॊकार होता. या लॊकरचे लॊक कापले होते. मी लॊकरची तपासणी केली. त्यात मला काही पुरावे सापडले. हे पुरावे पोलीसांना दिसले नव्हते.
जाधव आणि पाटील यांच्याकडे थोडी चॊकशी करून हॊलमध्ये आलो. तिथे कुमार हवालदार होता. त्याच्याकडे बघून मला चोर सापडला. बाहेर आल्यावर एन्स्पेटर जाधव यांनी “काही सापडल का ?” म्हणून विचारल. मी सांगितल चोर सापडला. माझ्या उत्तराने ते तीन ताड उडालेच. खूष होवून श्री. जाधव यांनी चोर कोण आहे, असे विचारले. मी लगेच हवालदार कुमारकडे बोट दाखवले. हे उत्तर त्याला अनपेक्षीत होते. पोलीस असल्याने त्याने लगेच पुरावा मागितला. मी लगेच खिशातून काही लाकडची तूस काढली. या तुसांचा रंग पोलिसांच्या काठीशी मिळता-जुळता होता. आणि कुमार यांच्या काठीचा पुढचा भाग देखील कुठेतरी अडकल्यावर खेचून काढल्यावर व्हावा, तसा झाला होता. हे बघितल्यावर कुमारचा चेहरा थोडा पडला. नंतर मी एक चांदणीच्या आकाराचा एक बिल्ला काढला. हा बिल्ला पोलीसांच्या शर्टाचा असल्याचे जाधव यांनी लगेच ओळखले. मी त्यांना कुमारचा एक बिल्ला गायब असल्याचे सांगितले. आपण पकडले गेल्याचे लक्षात येताच कुमारने लगेच चोरी कबूल केली.
माझ्या पुराव्याने पाटील व जाधव खूष झाले. जाता जाता इ.जाधव हळूच मला म्हणाले, “परत मदत लागल्यास नक्की कळवीन व तुला काही मदत लागल्यास मला नक्की सांग.”

Thursday 14 April 2011

खून की आत्महत्त्या ?

साधारण दुपारची वेळ होती. जेवण झाल्यावर मी मेल चेक करत होतो. एकाने सांगितल की ,“Hotel Tajमध्ये शेरलॊक होल्म्सच्या १५०व्या जयंतीनिमित्त स्पर्धा होणार आहेत.” मी शेरलॊक होल्म्सचा निस्मिम भक्त. त्यावर कार्यक्रम म्हटल्यावर मी जाणरच. मी लगेच होल्म्सची वेब-साईट चेक केली. बातमी खरी होती. ताज हॊटेलमध्ये त्यांनी स्पर्धांचे आयोजन केले होते. तारिख १५ एप्रिल, २०११. वेळ होती सकाळी ११ ते दुपारी . वेब-साईटवर स्पर्धेचा फॊर्म भरला. प्रवेश नि:शुल्कच होता.
मेगाब्लोक असल्याने मी थोडा लवकरच गेलो. हॊटेलमध्ये स्पर्धेसाठी जवळजवळ ५०० जण आले होते. स्पर्धेच स्वरूप सोपे होते. एका खोलीत सर्व रचना केली होती. आत जावून निरिक्षण करून आपले अनूमान नोंदवाचे होते. एक-एक करून सर्व आत जात होते आणि अनुमान सांगून दुसर्या दाराने बाहेर जात होते. माझा १२९वा नंबर होता.
२वाजता माझा नंबर आला. खोली खूप मोठी होती. दारातून आत गेल्यावर मोठा पॅसेज होता. तो पार केल्यावर उजव्या बाजूला x२चा x फूट लाबींचा राजेशाही पलंग होता. पण स्पर्धा असल्याने तो मोठा पलंग दिसण्या आधी खोलीत मध्यभागी टांगलेला मृतदेह मला आधी दिसला. माझ्याबरोबर आलेल्या पर्यवेक्षकांनी मला १५मिनिटांत खोलीच निरिक्ष्ण करायला सांगितल. खोली फार मोठी नव्हती. १०मिनिटांतच निरिक्षण करून, अनुमान नोंदवून दुसर्या दाराने बाहेर पडलो.
साधारण .३०वाजता स्पर्धा संपली. सगळे स्पर्धक निकालाची वाट बघत होते. शेवटी निकलाची वेळ आलीच. परिक्षकांनी सांगितल की, ५००पॆकी २००जण आले होते. त्यातले १९९ जणांनी आत्महत्या असल्याचे सांगितले. पण एकाचे मत खून असे होते. असे मत फक्त माझेच होते. परिक्षकांनी मला बाजूला बोलावून कारण विचारले. मी त्यांना त्या खोलीत घेवून गेलो आणि कारण सांगायला सुरूवात केली. पलंगावरची चादर चूरगळलेली होती पण कोपर्यावर गादी जास्त दबली होती. याचा अर्थ मयत माणूस मृत्यूआधी बराच वेळ बसला होता. पलंगा समोरच्या गालीच्यावर बूटांचे ठसे होते. पण अख्या खोलीत एकही बूट नव्हता. याचा अर्थ दुसरा एक माणूस त्या खोलीत होता. शिवाय बाथरूमच्या दाराजवळ दोन सिगार होल्डर होते. आता एक जण दोन होल्डर थोडी वापरणार ? आणि महत्त्वाचा मुद्दा, मृत शरिराचे हात बांधले होते. हात बांधून कोणीच स्वःताची मान फासात घालूच शकत नाही. या वरून आत्महत्याच असल्याचे सिद्ध होते. पर्यवेक्षक मझ्या उत्तराने खूष झाले. शेवटी मलाच विजयी म्हणून घोषित केल. प्रमूख पाहूणे होते डी. शिवानंदन(मुंबई पोलिस दलाचे संचालक) त्यांनीच मला बक्षिस दिले. जाताना त्यांचे शब्द माझ्या कानावर आले, “ये लडका मुंबई पोलिसके कुच काम का हॆ .”