Thursday 14 April 2011

खून की आत्महत्त्या ?

साधारण दुपारची वेळ होती. जेवण झाल्यावर मी मेल चेक करत होतो. एकाने सांगितल की ,“Hotel Tajमध्ये शेरलॊक होल्म्सच्या १५०व्या जयंतीनिमित्त स्पर्धा होणार आहेत.” मी शेरलॊक होल्म्सचा निस्मिम भक्त. त्यावर कार्यक्रम म्हटल्यावर मी जाणरच. मी लगेच होल्म्सची वेब-साईट चेक केली. बातमी खरी होती. ताज हॊटेलमध्ये त्यांनी स्पर्धांचे आयोजन केले होते. तारिख १५ एप्रिल, २०११. वेळ होती सकाळी ११ ते दुपारी . वेब-साईटवर स्पर्धेचा फॊर्म भरला. प्रवेश नि:शुल्कच होता.
मेगाब्लोक असल्याने मी थोडा लवकरच गेलो. हॊटेलमध्ये स्पर्धेसाठी जवळजवळ ५०० जण आले होते. स्पर्धेच स्वरूप सोपे होते. एका खोलीत सर्व रचना केली होती. आत जावून निरिक्षण करून आपले अनूमान नोंदवाचे होते. एक-एक करून सर्व आत जात होते आणि अनुमान सांगून दुसर्या दाराने बाहेर जात होते. माझा १२९वा नंबर होता.
२वाजता माझा नंबर आला. खोली खूप मोठी होती. दारातून आत गेल्यावर मोठा पॅसेज होता. तो पार केल्यावर उजव्या बाजूला x२चा x फूट लाबींचा राजेशाही पलंग होता. पण स्पर्धा असल्याने तो मोठा पलंग दिसण्या आधी खोलीत मध्यभागी टांगलेला मृतदेह मला आधी दिसला. माझ्याबरोबर आलेल्या पर्यवेक्षकांनी मला १५मिनिटांत खोलीच निरिक्ष्ण करायला सांगितल. खोली फार मोठी नव्हती. १०मिनिटांतच निरिक्षण करून, अनुमान नोंदवून दुसर्या दाराने बाहेर पडलो.
साधारण .३०वाजता स्पर्धा संपली. सगळे स्पर्धक निकालाची वाट बघत होते. शेवटी निकलाची वेळ आलीच. परिक्षकांनी सांगितल की, ५००पॆकी २००जण आले होते. त्यातले १९९ जणांनी आत्महत्या असल्याचे सांगितले. पण एकाचे मत खून असे होते. असे मत फक्त माझेच होते. परिक्षकांनी मला बाजूला बोलावून कारण विचारले. मी त्यांना त्या खोलीत घेवून गेलो आणि कारण सांगायला सुरूवात केली. पलंगावरची चादर चूरगळलेली होती पण कोपर्यावर गादी जास्त दबली होती. याचा अर्थ मयत माणूस मृत्यूआधी बराच वेळ बसला होता. पलंगा समोरच्या गालीच्यावर बूटांचे ठसे होते. पण अख्या खोलीत एकही बूट नव्हता. याचा अर्थ दुसरा एक माणूस त्या खोलीत होता. शिवाय बाथरूमच्या दाराजवळ दोन सिगार होल्डर होते. आता एक जण दोन होल्डर थोडी वापरणार ? आणि महत्त्वाचा मुद्दा, मृत शरिराचे हात बांधले होते. हात बांधून कोणीच स्वःताची मान फासात घालूच शकत नाही. या वरून आत्महत्याच असल्याचे सिद्ध होते. पर्यवेक्षक मझ्या उत्तराने खूष झाले. शेवटी मलाच विजयी म्हणून घोषित केल. प्रमूख पाहूणे होते डी. शिवानंदन(मुंबई पोलिस दलाचे संचालक) त्यांनीच मला बक्षिस दिले. जाताना त्यांचे शब्द माझ्या कानावर आले, “ये लडका मुंबई पोलिसके कुच काम का हॆ .”

1 comment: